नवी दिल्ली : सियाचीन येथील भारतीय लष्कराच्या ठाण्यावर हिमस्खलम झाल्याने चार जवानांसह सहा जण मरण पावले. त्यायत दोन हमलांचा समावेश आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
हिमस्खलन ज्या पथकावर आदळले, त्या लष्कराच्या गस्ती पथकात आठ जणांचा समावेश होता. ते अठरा हजार फूट उंचीवरील तळावर जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. त्यात सात जण गंभीररित्या झखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील सहा जणांचा तीव्र थंडीमुळे मृत्यू झाला.
सियाचीन पर्वतरांगावरील वस्तुस्थिती जाणून घेतल्याबद्दल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे कौतुक केले. या हिमस्खलानात मरण पावलेल्या जवान आणि नागरिकांबाबत त्यांनी शोक व्यक्त केला. जवान आणि हमालांच्या मृत्यूममुळे मला खूप वेदना झाल्या. मी त्यांचे धैर्य आणि देशसेवेला सलाम करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुख:त मी सहभागी आहे, असे ट्वि ट त्यांनी केले.