रवींद्र कदम
नगर – नगर- औरंगाबाद महामार्गावर महानगरपालिकेच्या हद्दीत वन-विभागाच्या कार्यालयासमोर रस्त्यावर पाण्याचे झरे वाहु लागले आहेत. हे झरे पाण्याची पाइपलाइन फुटल्याने वाहत असून, मनपाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाणी वायाजात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मनपाचा पाणी पुरवठा विभाग करतो काय?
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अनेक प्रभागात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांमधून सांण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी अवेळी पाणी येते, त्यामुळे पाण्याची वेळ निश्चित ठेवली पाहीजे. अनेक ठिकांनी व्हॉल्व्हला गळती सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे मनपाचा पाणी पुरवठा विभाग करतो काय असा प्रश्न उपस्थित होत असून, मनपाने व्हॉल्व्ह दुरुस्त करावे.
महानगरपालिकेच्या कार्यालयापासून हकेच्या अंतरावर वन विभागाचे कार्यालय आहे. वन विभागाच्या गेट समोरच नगर-औरंगाबाद रस्त्यावर गतीरोध असलेल्या ठिकांनी महानगरपालिकेची पाइपलाइन आहे. या पाईपलाईन द्वारे मुकुंदनगर, फकिरवाडा तसेच केडगावला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, त्या पाइपलाइनला गळती लागल्याने दरोरोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
त्याकडे मनपाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग करतो काय? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या जिल्ह्यातील धरणे ओहरफ्लो असले तरी पाण्याचा अपव्यवापर थांबविला पाहिजे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वाढली असली तरी दुष्काळी परिस्थितीत नगरकरांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने ही महामार्गावरील पाइप लाइनची गळतीचे बंद करून, पाण्याची बचत केली पाहिजे.
या पाइपलाइनद्वारे दररोज पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करण्यात येतो. मात्र याठिकाणी गळती सुरु असल्याने मुकुंदनगर, केडगाव, फकिरवाडा परिसरात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नाही. वनविभागाच्या कार्यालयासमोर काही प्रमाणात पाणी वाया जाते. त्याकडे मनपाने गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरातही अनेक ठिकांनी व्हॉल्व्हला गळती लागल्याने पाणी वाया जाते. कालच बागरोजा हडको भागातील मुख्य जलवाहीनीच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याणे हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. याबाबत संबंधित ठेकेदाराला माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून व्हॉल्व्ह त्वरित बंद करण्यात आले. अशीच तत्पर्ता मनपाने याठिकाणी ही दाखवावी.