नवी दिल्ली – माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे सरकारी बंगल्यातील वास्तव्य सोडणार आहेत. बंगल्याबरोबरच सरकारी वाहनेदेखील त्यांनी परत केली आहेत. ते लवकरच दक्षिण दिल्लीतील स्वत:च्या घरी वास्तव्याला जाणार आहेत.
कार्यकाल संपल्यानंतर एका महिन्यातच खासदारांनी ते राहात असलेल्या सरकारी बंगल्याचा ताबा सोडणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंधनकारक आहे.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे नव्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नका, अशी विनंती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती, त्यामुळे जेटली यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.