कोलंबो – विश्वकरंडक 2011 चे विजेतेपद श्रीलंकेने भारताला विकले, असा गंभीर आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. महिंदानंद अलुथगमगे या माजी क्रीडामंत्र्यांनी हे आरोप केले होते. मात्र, आता मला याबाबत केवळ संशय होता व आता त्याबाबत चौकशी व्हावी, अशी माझी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
हा विश्वकरंडक श्रीलंकेने भारताला विकला होता, असे त्यांनी आरोप केले होते. याची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे.