नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लॅंडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. महत्वाकांक्षी मोहिमेत संभाव्य यश न मिळाल्यामुळे वैज्ञानिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यावेळी इस्रोमध्ये उपस्थित असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देत त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक केले. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी चांद्रयान-2 यशस्वी न होण्यामागे मोदींचे इस्रोत उपस्थित असणे असल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रो कार्यालयात हजर होते. हा मोठा अपशकून होता असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. सात सप्टेंबर रोजी विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार होते. विक्रम लॅंडर अवघ्या . कि.मी अंतरावर असताना संपर्क तुटला. संपर्क सुरू होता तोपर्यंत लॅंडरमधील सर्व सिस्टम, सेन्सर्स अत्यंत अचूकतेने काम करत होते. असे उल्लेख करत कुमारस्वामी म्हणाले की, जसे काय मोदी चंद्रयान -2 चंद्रावर लॅंड करणार आहेत, असा संदेश देण्यासाठी इस्रोच्या कार्यालयात आले होते. या मोहिमेसाठी वैज्ञानिकांनी दहा ते वर्ष मेहनत घेतली. पण मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने इस्रोमध्ये आले होते. त्यांनी इस्रोच्या कार्यालयात पाय ठेवला आणि तो क्षण शास्त्रज्ञांसाठी दुर्भाग्याचा ठरला असे वादग्रस्त वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा भाजपच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे.