भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने बीसीसीआयबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ‘आपल्याकडे बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचे’ त्याने म्हटले आहे. मुरली विजयने भारतासाठी भरपूर कसोटी क्रिकेट खेळलेले आहे. एका काळात तो भारतासाठी कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज बनला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या कामगिरीत उतार-चढाव आला आणि त्याची भारतीय संघातील जागाही संपुष्टात आली. त्यानंतर त्याला कधीही भारतीय संघात पुनरागमन करता आले नाही.
Maharashtra Kesari 2023: पैलवान शिवराज राक्षेंवर बक्षीसांचा आणि कौतुकाचा वर्षाव
मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर बरीच वर्षे भारतीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरी खालावल्याने २०१८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंतच तो संघासोबत राहिला. त्या काळात तो सातत्याने खराब कामगिरीचा शिकार ठरत होता. त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आपल्या कारकिर्दीत ६१ कसोटी सामन्यांमध्ये जवळपास ४००० कसोटी धावा करणाऱ्या मुरली विजयने १२ शतकही झळकावले आहेत. त्याला संघातून वगळण्यात आल्यानंतर लगेचच त्याच्या जागी नवीन खेळाडू तयार झाले आणि मुरली विजय कधीही संघात येऊ शकला नाही.
#SarfarazKhan । मुंबईचा सरफराज पाडतोय धावांचा पाऊस; तरीही भारतीय संघात मिळत नाही संधी
स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत मुरली विजयने सतत दुर्लक्ष केल्याबद्दल बीसीसीआयला फटकारले. तो म्हणाला, ‘मी आता बीसीसीआयला कंटाळलो आहे आणि परदेशात संधी शोधत आहे. मला आता आणखी आव्हानात्मक क्रिकेट खेळायचे आहे. भारतात ३० वर्षांनंतर लोक तुम्हाला ८० वर्षांचे असल्यासारखे समजू लागतात. प्रसारमाध्यमेही याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहतात. माझ्या मते मला वाटते की मी आणखी क्रिकेट खेळू शकतो. मात्र, आता संधी फारशा नाहीत आणि मला बाहेरच्या संधी शोधाव्या लागणार आहेत. माझ्या मते तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करू शकता. तुम्ही बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही.”