नवी दिली – संघ आणि भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात. देशात हिंसा होण्याची दोन कारणे आहेत. लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही, त्यामुळे लोक भडकलेले असतात. तर दुसरे कारण हे भाजपा आणि आरएसएसचे लोक आहेत असा आरोप कॉंग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी इंदौर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली आहे.