नवी दिल्ली – पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. दिल्लीत गेले दोन महिने शाहींनबागेत मुस्लिम व अन्य समाजाच्या महिला धरणे धरून बसल्या आहेत. पण दिल्लीत भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी सीएए कायद्याच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला होता त्यावेळी झालेल्या दगडफेकीच्या अनुषंगानेच ओवैसी यांनी हा आरोप केला आहे.
ओवैसी यांनी या दंगलींचा निषेध केला असून विदेशाचा राष्ट्रप्रमुख भारत दौऱ्यावर आला असताना असा हिंसाचार घडणे ही भारतासाठी लाजीरवाणी बाब आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीतील स्थिती सुरळीत करण्यासाठी अमित शहा यांनी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
सीसीए कायद्याच्या विरोधात जे धरणे धरून बसले होते त्यांच्यावर मोदी शहांच्या पोलिसांनी दंगेखोरांच्या साथीने दगडफेक केल्याचा आरोपही त्यांनी काल रात्री एका निदर्शनांच्यावेळी बोलताना केला.