जुन्नर तालुक्यात पत्रावळी-द्रोणांचा रोजगार होतोय कमी
उपजीविका करणारे कुटुंबे व्यवसायापासून कोसो दूर
– रामदास सांगळे
अणे – प्लॅस्टिक आणि थर्मोकोलच्या जमान्यात पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोण कालबाह्य झाले आहेत. पळसाच्या पानाच्या पत्रवाळ्यामुळे अनेकांना रोजगार उपलबद्ध झाला होता. पावसाळा समाप्त झाला की पत्रावळ्या बनवायचं काम सुरू होते. पूर्वी लग्नात आणि घरगुती कार्यक्रमात सामूहिक जेवणाच्या पंगती पळसाच्या झाडांच्या पानांची पत्रावळी व पानांचा द्रोण यांचा वापर सर्रास केला जात होता. सध्या मात्र पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी या कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.
पूर्वी पत्रावळींना विशेष महत्त्व असायचे. यांच्यावर उपजीविका करणारे हजारो कुटुंब या व्यवसायापासून कोसो दूर गेले आहेत. झाडांच्या पानांच्या पत्रावाळी ऐवजी आता सर्वत्र प्लॅस्टिक, तसेच थर्माकोलच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिकचे ग्लास यांचा वापर केला जात आहे. प्लॅस्टिक तसेच थर्माकोल हे मानवी आरोग्यास घातक असूनही त्यांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे चित्र सध्या सर्व कार्यक्रमात दिसत आहे. लग्न, साखरपुडा, घराची पूजा, जागरण गोंधळ, गणपती उत्सव, तसेच नवरात्र उत्सवात ही जेवणाला प्लॅस्टिक आणि थर्मोकोलच्या पत्रवाळ्यांचा वापर होत आहे.
अशा बनवतात पळसाच्या पानांची पत्रावळी
पळसाच्या पानांना सुतळीद्वारे गुंफले जात असे. पानांचे देठ कापून पाने एकावर एक एक रचून ठेवले जातात. ही पाने एकमेकांना टाचण्यासाठी पानांचा देठांचा वापर केला जातो. साधारण एक पतरवाळी बनवण्यासाठी सात ते आठ पाने वाचली जातात. ही पतरवाळी काहीशी ओबडधोबड आकारात अशे. अशा काही पत्रावळी तयार झाल्या की त्यांना एक सारखा गोलाकार देणे आवश्यक असते, त्यासाठी दगडी जात्याचा तळीची मदत घेतली जातेवर ठेवून त्या बाहेर आलेला भाग कात्रीने कापून घेतला जातो. प्लॅस्टिक बंदी नंतर या पतरवाळी यांना चांगले दिवस येण्याची आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु प्लॅस्टिकच्या पत्रावळी सहज मिळत असल्यामुळे नागरिक प्लॅस्टिकचा पत्रावळी खरेदी करतात.
पूर्वी पानांच्या पत्रावळी व सामूहिक पंगत रंगत असत वरण भात व भाजीचा स्वाद द्विगुणित होत असे परंतु आता पत्रवाळी बरोबरच सामुहिक पंगतीची परंपरा देखील हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे; पण त्याऐवजी आता सामूहिक जेवणासाठी पद्धत वाढत चाललेली आहे, त्यामुळे पत्रावळीतील भोजनाचा स्वाद आणि द्रावणामध्ये कडी पिण्याचा आनंद हरवत चालला आहे.
– गबाजी भोर, ज्येष्ठ नागरिक, वडगाव कांदळी, ता.जुन्नर
प्लास्टिकच्या पत्रावळ्या वापरून झाल्यानंतर त्याचे विघटन लवकर होत नाही या पत्रावळ्या जनावरांनी खाल्ल्यास जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते. तसेच या पत्रावळ्या चा जास्त वापर केल्यास माणसांना कॅन्सर व हार्मोन्स चे आजार होण्याची शक्यता जास्त असते. जैविक सृष्टीवर प्रदूषणाचा घातक परिणाम होतो.त्यामुळे या पत्रावळ्या मानवी आरोग्यास हानिकारकच आहेत.
– डॉ. उमेश घोडे आरोग्य अधिकारी, जुन्नर