पुणे – एखाद्या ग्राहकाचे वीज बिल थकल्यास महावितरणकडून अनेकदा नोटीस पाठविले जाते. मात्र, शहरातील अनेक गणेशमंडळांना गणेशोत्सव काळात वीज जोडणी करण्यासाठी परवानगी देताना गेल्या 3 वर्षांपासून घेतलेली अनामत रक्कम अद्यापही महावितरण विभागाने परत केलेली नाही.
पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांना उत्सवासाठी व विविध प्रकारचे देखावे सादर करण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी वीज कनेक्शन देण्यात येतात. यासाठी महावितरण गणेश मंडळांकडून 5 ते 25 हजार रुपये अनामत रक्कम घेते. गणेशोत्सव झाल्यानंतर गणेश मंडळांनी वीज बिलांचा भरणा केल्याचे कागदोपत्री दाखविल्यानंतर ही रक्कम परत देणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून गणेश मंडळांची लाखो रुपयांची अनामत रक्कम परत केली नसल्याचे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष गणेश नलावडे यांनी निदर्शनास आणले आहे.