राजेंद्र भुजबळ
शिर्डी -आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान म्हणून ओळख असणाऱ्या शिर्डीच्या साई मंदिराची ओळख जगभर आहे. साईबाबांनी श्रद्धा सबुरीचा दिलेला अनमोल मंत्र संपूर्ण जगाने मान्य केला, म्हणून आज शिर्डीत देश-विदेशातील करोडो भाविक वर्षभरात हजेरी लावतात आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन आनंदी राहतात. शिर्डीत एका सुवर्ण वर्षाची श्री साईबाबा संस्थानला विसर पडल्याचे चित्र आहे.
अर्थात कोविडच्या कारणाने साई संस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात जणू विर्जन पडले असं म्हणणं सुद्धा खरं आहे. मात्र साई संस्थान स्थापनेच शताब्दी वर्ष आणि त्याचा पडलेला विसर हे संस्थान शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणे आहे हे दुर्दैव आहे.
13 फेब्रुवारी 1922 रोजी श्री साईबाबा संस्थानची स्थापना झाली. त्यावेळी संस्थांनच्या तिजोरीत अवघे 2 हजार 200 रुपये होते तर पंधरा जणांची असणारी समिती की जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली. अर्थात विश्वस्त मंडळ ह्याच विश्वस्त मंडळाची सर्वात पहिली बैठक ही रामनवमीच्या महूर्तावर झाली होती.अनेक भाविकांना भक्तमंडळात सामील केले होते आणि आज ह्याच भक्तमंडळात लाखो भाविक सदस्य आहेत. दुसरीकडे देश-विदेशातील शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी बाबांच्या झोळीत हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी आणि रोकड टाकून आज एका फकिराला सोन्याच्या सिंहासनावर विराजमान केले आहे. अर्थात आजही बाबा सर्व गोगरीब, सर्व जाती धर्मांसाठी एक प्रेरणास्थान आहे.
भाविकांनी दिलेल्या दानातून शिर्डी गावाचा व मंदिराचा विकास झाला असला तरी ह्या दानाचा उपयोग गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अर्थात मोफत हॉस्पिटल, मोफत जेवण, अल्पदरात राहण्यासाठी भक्तनिवास, शालेय संकुल यासह भाविकांसाठी अद्ययावत दर्शनरांग हे प्रकल्प सुरू आहे, मात्र साई संस्थान स्थापनेच्या शताब्दी वर्षाचा विसर पडल्याने प्रशासनाने कोणतेही नवीन प्रकल्प, उत्सव आणि माहिती भविकांपर्यंत पोहचवू न शकल्याने शंभर वर्षातून एकदाच येणाऱ्या या सुवर्ण क्षणाला अनेक जण वंचित राहिल्याच दुःख आहेच. परंतु साई संस्थान प्रशासन व विश्वस्त मंडळाने उत्साह न दाखविल्याने संस्थान स्थापनेच्या शताब्दी वर्षाला कोणतेही धार्मिक कार्यक्रम, संकल्प, भाविकांसाठी सुविधा, नवीन विकासाची कामे, अद्ययावत हॉस्पिटल आणि इतरही प्रकल्प यावर कोणीही गांभीर्याने विचारच केला नाही.
त्यामुळे केवळ पद मिळाले आणि मोठेपणा प्राप्त झाला.
या गैरसमजात वावरणाऱ्या नवीन विश्वस्त मंडळाने 13 तारखेच्या आत साई संस्थान स्थापना शताब्दी वर्षाचा छोटेखानी कार्यक्रम जरी केला तरी शताब्दी वर्षाचा आनंद अनेक भाविकांना मिळू शकतो आणि साई संस्थांनची कामगिरी सुद्धा जगभरात माहिती होऊन बाबांच्या नगरीत नक्कीच भाविकांची गर्दी होईल, हीच अपेक्षा शिर्डी ग्रामस्थ व तमाम भाविकांना आहे. मात्र साई संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होऊनही साई संस्थान प्रशासन अनभिज्ञ आहे हे विशेष.