सिमे पलिकडून होणारा गोळीबार थांबवण्याची सुचना
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बुधवारी एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकार पाकिस्तानी सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या निर्दोष नागरिकांच्या हत्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे. हे सर्व प्रस्थापित मानवतावादी निकषांच्या आणि व्यावसायिक लष्करी आचरणांच्या विरूद्ध आहे.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी निर्दोष नागरिकांच्या हत्येसारख्या कृत्यांचा तपास करावा आणि आपल्या सैन्याला अशाप्रकारचे कृत्य करण्यापासून थांबवावे. पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण गोळीबार केल्याने एका निर्दोष भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आज परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी पुन्हा प्रकट केली आहे.