आळंदी – वरुणराजाने सोमवारी (दि. 24) पावसाने हजेरी लावल्याने आलेल्या लाखो वैष्णवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रविवारी (दि. 23) दुपारी वरुणराजाने आपली हजेरी लावल्याने वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता.
सलग दोन दिवस पाऊस झाल्याने मंगळवारी (दि. 25) प्रस्थान सोहळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात
वरुणराजा दमदार बरसवा अशी प्रार्थना वैष्णव करीत आहे. आळंदीत रविवारपासून वारकऱ्यांसह पाऊसही दाखल झाल्याने आळंदीकर सुखावला असला तरी तो मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत आहे.