मुंबई : शिवसेनेशी बंड केल्यानंतर काल मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली मात्र संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना आज संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नव्या सरकारला शुभेच्छा देताना ‘नवा संसार सुखाने करा’ असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे.
प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, ‘सोईनुसार राजकारण झाले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा ! नवा संसार सुखाने करा. याशिवाय आम्ही सरकार मध्ये अडथळे निर्मण करणार नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
I will be appearing bfore the ED tody at 12 noon. I respect the Summons issued to me and it's my duty to co-operate with the Investigation agencies
I appeal Shivsena workers not to gather at the ED office
Don't worry !@PawarSpeaks @OfficeofUT @MamataOfficial @RahulGandhi pic.twitter.com/Vn6SeedAoU
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2022
पुढे बोलताना ते म्हणाले , ‘जीथे ठाकरे तिथे शिवसेना असणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस नाराज आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांशी बोलल्याशिवाय ते कळणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत आज ईडी च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ट्विट करीत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आज मी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. काळजी करू नका’ अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
नव्या सरकारच्या अडचणीत वाढ ?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. गुरुवारी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता नव्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नव्या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आता याविरोधात शिवसेना कोर्टात जाणार आहे.