पुणे: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अस विधान त्यांनी केलं आहे.
पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या विधानानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं मूर्खपणाचं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपटून मार खाल्ला. धर्मांध शक्तींना विरोध करणारे शरद पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री किंवा ‘यांना’ पवारांचा अडसर वाटणे स्वाभाविक आहे.
आधी, तुमच्या भाजपने बहुजनांवर काय अत्याचार केले, ते बघावे. मूर्ख माणसं बडबडत असतात. आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिली.