नगर – करोनापासून वाचण्यासाठी मुलांच्या निरोगी शरीरा बरोबरच निरोगी मनही गरजेचे आहे. मना बरोबर शरीर निरोगी असेल तर कोणत्याही परीस्थिला तोंड देण्याची क्षमता आपल्यात येते. यासाठी मुलांनी भरपूर खेळले पाहिजे. तसेच व्यायाम करून भरपूर ऑक्सिजन घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवावी. त्याच बरोबर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश महेश नातू यांनी केले.
जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने रिमांडहोम मधील विद्यार्थ्यांना आय लव्ह नगर संस्थेच्या सहकार्याने कापडी मास्क व सॅनिटाझरचे वाटप जिल्हा न्यायाधीश महेश नातू व जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुनीलजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्ष ऍड. सुहास टोणे, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अधीक्षक मोहिनीराज घावटे, रिमांडहोमच्या अधीक्षक पोर्णिमा माने, ऍड. सागर पादीर, जी.प.चे सेवानिवृत्त काधिकारी एम.पी.कचरे, अधिकारी नरेंद्र देशमुख, सुनील दस्सुर, रेखा जाधव, शीतल प्रभुणे उपस्थित होते.
यावेळी न्या. पाटील म्हणाले, करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अशा परिस्थीत सर्व नियमांचे पालन करूनच या रोगा पासून आपण वाचू शकतो. नागरिकांमध्ये जनजागृती साठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सातत्याने काम करत आहे.