पेठ- आंबेगाव येथील दत्तात्रय मारुती नेटके व संध्या दत्तात्रय नेटके हे दांपत्य गेली चाळीस वर्ष तमाशा कलावंत म्हणून काम करत आहे. दत्तात्रय हे गायक तसेच वगनाट्य मध्ये ज्यांनी राजा ,प्रधान म्हणून उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांची करमणुक केली. मात्र कोरोनामुळे त्यांचा वर उपासमारीची वेळ आली आहे.
आज दत्तात्रय नेटके हे मुख्य भूमिका आणि त्यांची पत्नी संध्या या उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून काम करत आहेत. आज करोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला भीती घातलेली आहे. आज तमाशा कलावंतांच्या उपासमारी होत आहे .अशा परिस्थितीमध्येही या कलावंताने करोना या आजारावर जनजागृतीपर प्रबोधनपर एक गीत रचलेले आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी लोकांना काय काळजी घ्यावी हे सांगितलेले आहे. आणि विशेष म्हणजे हे गीत त्यांनी स्वतः रचलेले आहे ते स्वतः गीत लिहितात त्याचबरोबर उत्कृष्ट गायक असल्यामुळे आपण केलेली त्याची रचना अत्यंत उत्कृष्ट स्वरांमध्ये ही गातात. असाच संदेश त्यांनी स्वतः रचलेल्या गीतांमधून समाजाला दिलेला आहे.