टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर आता टीम इंडियासाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार नेमण्याबाबत चर्चेला वेग आला आहे. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे अधिकृत संकेत मिळलेले नाहीत. परंतु सध्या तात्पुरत्या स्वरूपात टी-२० मध्ये हार्दिक पंड्या आणि वनडेमध्ये शिखर धवन यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी शिखर धवनने संघातील त्याचे स्थान आणि कर्णधारपदाबद्दल उघडपणे बोलले आहे. शिखर धवनने टीम इंडियासाठी आतापर्यंत १६१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
“हार्दिक पंड्यामुळे मला संघाबाहेर काढलं”, अष्टपैलू खेळाडूने व्यक्त केली नाराजी!
एकाच फॉरमॅटमध्ये लक्ष दिल्याचा फायदा
एका फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केल्याने त्याचे आयुष्य आणि खेळ सुधारला असे शिखर धवनला वाटते. तो म्हणाला की, ‘मी एकाच फॉरमॅटमध्ये खेळतोय ही गोष्ट माझ्यासाठी आशीर्वादासारखी आहे. त्यामुळे मला इतर गोष्टी करायला वेळ मिळतो. जेव्हा मी तिन्ही फॉरमॅट खेळत होतो त्यापेक्षा मी आता अधिक फ्रेश राहतो आणि स्वतःला अधिक मजबूतही समजतो. सध्या आमच्याकडे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी अनेक खेळाडू आहेत. पण मला स्वत:ला एका फॉरमॅटमध्ये तयार ठेवायचे आहे जेणेकरून मी कोणाच्याही मागे राहू नये.’
“हार्दिक पंड्यामुळे मला संघाबाहेर काढलं”, अष्टपैलू खेळाडूने व्यक्त केली नाराजी!
संघातील मी माझ्या स्थानाला पक्के मानत नाही
संघातील आपल्या स्थानाबाबत धवन म्हणाला की, ‘मी माझे संघातील स्थान गृहीत धरत नाही.’ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंमध्ये धवनचाही समावेश होतो. तो पुढे म्हणाला की, ‘मी सातत्यपूर्ण कामगिरी करण्याकडे लक्ष देत आहे. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत मी काहीही गृहीत धरू शकत नाही आणि मी ते नेहमी लक्षात ठेवतो.’