पुण्यात कहर पावसाचा की सरकारी असंवेदनशीलतेचा?
पुणे: राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तींबाबत हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे जनतेने कोल्हापूर-सांगली महापूराच्यावेळी पाहिले आहे. महाजनादेश यात्रेत मग्न असणारे मुख्यमंत्री पुराची फक्त हवाई पाहणी करून आले, तर मंत्र्यांनी पूरपर्यटन केले. या सरकारी निष्क्रियतेचीच आज पुण्याच्या पुरादरम्यान पुनरावृत्ती पाहायला मिळाली असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
पुण्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीत सरकारी मदत मिळणे सोडाच. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जागावाटपाच्या बैठकीत व्यस्त आहेत. पुण्यात इतकी गंभीर परिस्थिती असतानाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत, मग जनतेने अपेक्षेने कोणाकडे पाहायचे? पुण्यात कहर पावसाचा की सरकारी असंवेदनशीलतेचा? असे विचारण्याची वेळ दुर्दैवाने या सरकारने आणली असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.