पुणे -कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्या जिल्ह्यातील काही भागात निर्माण झालेली पूरस्थिती आणि दुसरीकडे काही भागात असलेल्या दुष्काळाचा फटका पनीर आणि खव्याला बसला आहे. तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन्ही पदार्थ्यांच्या भावात वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात ही परिस्थिती निर्माण झालाने मिठाईवालेदेखील अडचणीत आले आहेत
पुणे शहरात 25 टन पनीरचा खप आहे. पनीर विशेषत: सांगली, कोल्हापूर जिल्हा कर्नाटकातील महाराष्ट्रालगत असलेल्या भागातून पुरविले जाते. सध्या 240 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. तर, दररोज 10 ते 12 टन खव्याचा खप आहे. 200 ते 220 रुपये किलोने खव्याची विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.