नवी दिल्ली – देशांतर्गत नागरी उड्डाणे येत्या २५ मेपासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशातच आज नागरी उड्डाणांना सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाद्वारे याबाबत आणखी एक महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती देताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी येत्या तीन महिन्यांसाठी सरकारतर्फे विमानप्रवासाचे किमान व कमाल तिकीटदर ठरवण्यात आले असल्याचे सांगितले.
सरकारतर्फे ठरवण्यात आलेले विमानप्रवास तिकीटदर प्रवासाच्या कालावधीवरून आकारण्यात येणार असून यासाठी देशांतर्गत विमानप्रवासाचे ७ टप्पे पाडण्यात आले आहेत. जर तुम्ही दिल्ली ते मुंबई हा ९० ते १२० मिनिटे टप्प्यात मोडणारा विमानप्रवास करीत असाल तर यासाठीचा तिकीटदर कमीतकमी ३,५०० व जास्तीत जास्त १० हजार एवढा ठरवण्यात आला आहे.
तिकीटदरातील गोंधळ टाळण्यासाठी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना विमानातील ४० टक्के तिकिटे ठरवण्यात आलेल्या किमान व कमाल किमतीच्या मध्य किमतीवर विकणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच किमान तिकीटदर ३,५०० व कमाल तिकीटदर १०,००० असणाऱ्या विमानप्रवासातील ४० टक्के तिकिटे ६,७०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये विकावी लागतील.
असे आहेत देशांतर्गत विमान प्रवासाचे ७ टप्पे
1) विमानप्रवासाची वेळ 40 मिनिटांपेक्षा कमी
2) विमानप्रवासाची वेळ 40 – 60 मिनिटे
3) विमानप्रवासाची वेळ 60 – 90 मिनिटे
4) विमानप्रवासाची वेळ 90 – 120 मिनिटे
5) विमानप्रवासाची वेळ 120 – 150 मिनिटे
6) विमानप्रवासाची वेळ 150 – 180 मिनिटे,
7) विमानप्रवासाची वेळ 180 – 210 मिनिट
40% of seats have to be sold at a fare less than the midpoint of the band. For example, midpoint of Rs 3500 & Rs 10000 is Rs 6700. So 40% of the seats have to be sold at a price less than Rs 6700. This is how we’re ensuring that fares don’t go out of control: Civil Aviation Secy https://t.co/KlapuNf7bk pic.twitter.com/wl96ZzfmI2
— ANI (@ANI) May 21, 2020