नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सोमवारी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीश विविध आजारांनी त्रस्त आहेत त्यामुळे ते न्यायाधिश कोर्टात येऊ शकले नाहीत. त्यामुळे या न्यायाधिशांपुढील आजच्या तारखांचे फेरनियोजन केले जात आहे.
सरन्यायाधिशांनी सांगिेतले की, काही न्यायाधीश उपलब्ध नसल्यामुळे आजच्या तारखा ज्या केसेसमध्ये दिल्या गेल्या त्या केसेस बंद केल्या जाणार नाहीत. न्यायाधिश उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या पुढील सुनावणी रद्द होणार नाही. या तारखांचे फेरनियोजन केले जाईल.
आजारी न्यायाधिशांपैकी काही जणांना कोविडची लागण झाली आहे.
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी या मागणीच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज होणारी सुनावणी रद्द केली कारण घटनापीठातील काही न्यायाधीशांना कोविडची लागण झाली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक केशवानंद भारती निकालाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचना सिद्धांताची स्थापना करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या 13 मतांचा समावेश असलेले एक विशेष वेब पृष्ठ तयार केले आहे.
7 विरूद्ध 6 च्या बहुमताने, 24 एप्रिल 1973 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारतींच्या निकालात, संविधानाच्या मूलभूत संरचनेत संसदेद्वारे सुधारणा करता येणार नाही असा महत्वपुर्ण निर्णय दिला होता.