नवी दिल्ली : देशाच्या ईशान्य विभागातील आठपैकी पाच राज्ये पूर्णपणे करोनामुक्त आहेत. तर, उर्वरित तीन राज्यांत मागील काही दिवसांत एकही नवा करोनाबाधित आढळलेला नाही.
देशावर करोना संकट घोंघावत असताना ईशान्य विभागातून मिळालेली गुड न्यूज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
सिंह त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. सिक्कीम, नागालॅंड, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा ही राज्ये पूर्ण करोनामुक्त आहेत. तर आसाम आणि मेघालयात प्रत्येकी 8 आणि 11 करोनाबाधित आहेत. मिझोराममध्ये अवघा 1 करोनाबाधित आहे. ईशान्येकडील तीन राज्यांत सध्या असणारे करोबाधित बरे झाले आहेत. नव्या चाचण्यांमधील त्यांचे अहवाल लवकरच निगेटीव्ह येतील, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.