वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
नवी दिल्ली : पुढील दहा वर्षांमध्ये देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन पुन्हा सुपीक बनवण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी सरकार केंद्रीय स्तरावर महत्त्वाकांक्षी योजना तयार करत असल्याची घोषणा वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या योजनेद्वारे 75 लाख रोजगारही निर्माण होतील, असा दावाही पर्यावरणमंत्र्यांनी केला.
देशभरातील नापीक जमिनीची सूक्ष्म नोंदणी केली जाईल. जमीन पुन्हा पिकाऊ बनवण्यासाठी, जमिनीचा कस वाढवण्यासाठी राबवल्या जात असलेल्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवून र्सवकष योजना लागू केली जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. तसेच जगातील एकतृतियांश जमीन नापीक बनली आहे किंवा त्या जमीनींचा कस कमी झाला आहे. भारतात 29 टक्के जमीन नापीक असून ती पुन्हा सुपीक बनवली पाहिजे अशी इच्छा देखील यावेळी जावडेकर यांनी व्यक्त केली.