बुलंदशहर – उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने पाच जणांचा बळी गेला असून या दारूतून अन्य 16 जणांना विषबाधा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री जीत गली भागातील एका गुत्त्यातून मिळणारी गावठी दारू या लोकांनी प्रशासन केली होती.
ही दारू विकणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. ही दारू विकणाऱ्यांच्या विरोधात रासुका आणि गॅंगस्टर कायद्या अंतर्गत कारवाई करण्याच्या सुचना मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. ही विषबाधा नेमकी कशाने झाली याचा शोध जारी असून संबंधीत इसमाकडून उर्वरीत दारू साठाही जप्त करण्यात आला आहे.