वर्धा : जिल्यात पाच कोरोना संशयित नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या पाच कोरोना संशयितानी सूचनेचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनने कारवाई करत या पाच नागरिकांच्या दुकानांना सील केले आहे. हे संशयित कोरोनाबाधित देशातून आले होते. त्यामुळे त्यांना त्यांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
Ministry of Family and Health Welfare: Total number of confirmed #COVIDー19 cases across India is 107 (including foreign nationals as on 15th March at 12 PM) #Coronavirus pic.twitter.com/O9OupPUUjJ
— ANI (@ANI) March 15, 2020
मात्र त्यांनी प्रशासनचे आदेश न पाळता दुकाने सुरु ठेवले होते. तसेच हे पाचही संशयित सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आले होते.
दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या राज्यात ३२ वर पोहचली आहे. तर देशात १०७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.