नवी दिल्ली – मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आज नीति आयोगाची पहिली बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षत्येखाली होणाऱ्या या नीति आयोगाच्या बैठकीला अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल उपस्थित असणार आहेत. मात्र, या बैठकीला उपस्थित राहणे आपल्याला जमणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. तसे त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळवले होते.
The agenda at the Fifth Governing Council Meeting of #NITIAayog will focus on the internal security situation in the country with a specific focus on development in Left Wing Extremism (LWE) areas. #FifthGCM pic.twitter.com/nrFc3J490j
— NITI Aayog (@NITIAayog) June 14, 2019
बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की ‘नीती आयोगाला कोणतेही अर्थिक अधिकार नाहीत. त्यामुळे राज्यांच्या नियोजनात त्यांना काही लाभ होईल असे मला वाटत नाही त्यामुळे या आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणे निष्फळ ठरणार असल्याने आपण या बैठकीला उपस्थित राहू इच्छित नाही असे त्यांनी म्हटले आहे. नियोजन आयोग रद्द करून नीति आयोगाची स्थापना करणे अयोग्य असल्याचे त्यांचे खूप पहिल्यापासूनचे म्हणणे असून त्यांनी यापुर्वीच्याही नीति आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले होते. आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून त्यात देशाच्या विकासावर चर्चा होणार आहे.’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या नीति आयोगाच्या बैठकीचा अजेंडा ठरला आहे. यामध्ये जल संधारण, कृषी आणि सुरक्षेतेच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. ही बैठक राष्ट्रपती भवनात होणार आहे. तसेच, या बैठकीला वित्त, गृह, संरक्षण, कृषी, वाणिज्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री उपस्थित राहणार आहे.