पुणे – राज्यात खरीप हंगामातील पिकांकरिता काढलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी असलेल्या दोन विमा कंपन्यांना राज्याच्या कृषी विभागाने 682 कोटी, 29 लाख, 56 हजार, 694 रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध करून दिला आहे.
ही रक्कम राज्याच्या हिश्याची असून कृषी आयुक्तालयाच्या वतीने यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसताना देखील आवश्यक बाब म्हणून ही रक्कम अदा केली आहे.