नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या मयतांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारतर्फे 4 लाख रूपयांची आर्थिक मदत कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. या संदर्भात एनआयए या वृत्तसंस्थेने सरकारने अशी घोषणा केल्याचे म्हंटले आहे.
कोरोना हे राष्ट्रीय संकट असल्याचे केंद्रीय गृहखात्याने शनिवारी जाहीर केले आहे. त्याआधारे राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद निधीतून हि चार लाखांची मदत देण्यात येणार आहे.
दरम्यान कोरोना विषाणूमुळे भारतात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून ८२ जणांना विषाणूची लागण झाली आहे. राज्यात या विषाणूची लागण झालेले १९ रुग्ण विलीगीकरण कक्षात उपचार घेत आहेत तर, अनेकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य राज्यसरकारने सूचना जारी करत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहे.