फडणवीस सरकारला मिळाले आणखी 24 तास
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर आज पुन्हा या प्रकरणावर न्यायालयने सुनावणी केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूने सादर आज युक्तीवाद करण्यात आला मात्र, यावर आज न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. आता या प्रकरणात उद्या सकाळी न्यायालय अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
NCP-Congress-Shiv Sena petition: Supreme Court reserves order for tomorrow 10.30 am. https://t.co/PyKO0WzEJ4
— ANI (@ANI) November 25, 2019
राज्यातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. तर दुसरीकडं आमदारांना एकसंध ठेवून भाजपाला बहुमत चाचणीत पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, न्यायालयात सुनावणी सुरू झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यात भापजला पाठिंबा देणाऱ्या 54 आमदारांच्या सह्या होत्या तसेच राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे याच पत्राच्या आधारे राज्यपालांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली असल्याचे भाजप आणि अपक्ष नेत्यांच्यावतीने मुकुल रोहतगी यांनी न्यायालयास सांगितले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्याकडून युक्तीवाद करणारे मनु सिंघवी यांनी आपण हरायला तयार आहोत तुम्ही फक्त बहुमत चाचणीसाठी तयारी दर्शवा असेही सिंघवी यांनी म्हटले.