मुंबई : अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते.
दरम्यान, याआधी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा अशी भावना मोठ्याप्रमाणावर सामान्यांमध्ये आहे, असे म्हटले आहे.
तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही या प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची केस सीबीआयला देण्यात यावी, अशी मागणी सुशील मोदींनी केली आहे.