मुंबई – भारत आणि बांगलादेश यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘बंगबंधू’ या शेख मुजीबुर रहमान यांच्यावरील चरित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी इथे काल सुरुवात झाली.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल या चरित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रपित्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी या बाबत घोषणा केली होती.
अतुल तिवारी आणि शामा जैदी यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर नितीश रॉय चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत.संगीत शंतनू मोईत्रा यांचे आहे.आकाशदीप फोटोग्राफी दिग्दर्शक आहेत.100 दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.