हैदराबाद – तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या विरोधात शनिवारी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ए.रेवंथ रेड्डी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. देशासाठी नवी राज्यघटना बनवण्याची वादग्रस्त भूमिका मांडल्याबद्दल राव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रेड्डी यांनी केली आहे.
सध्याची राज्यघटना देशातील जनतेच्या आकांक्षांची पूर्ती करू शकत नसल्याचा आरोप राव यांनी केला. नवी राज्यघटना आणण्याची त्यांची भूमिका देशद्रोह करणारी आहे, असे रेड्डी यांनी म्हटले.
आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील तक्रारीनंतर पोलीस काय पाऊल उचलणार याविषयी उत्सुकता आहे. आम्ही कायदेशीर मत मागवले आहे. त्याआधारे पुढील पाऊल उचलू, अशी भूमिका तूर्त तेलंगण पोलिसांनी घेतली आहे.