जयपूर – कॉंग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया आणि भाजपच्या युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आज भाजपच्या कार्यालयाबाहेरच जोरदार हाणामारी झाली. “एनएसयुआय’चे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यासाठी जमा झाले होते. त्यावेळी भाजपच्या युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा संघर्ष झाला.
“एनएसयुआय’च्यावतीने शांततेने आंदोलन केले जात होते. मात्र युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी “एनएसयुआय’च्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली, असा आरोप “एनएसयुआय’चे प्रवक्ते रमेश भाटी यांनी केला आहे. “एनएसयुआय’च्या काही कार्यकर्त्यांनी बळजबरीने भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पोलिसांनी थांबवले. त्यानंतर संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असे पोलीस उपायुक्त मनोज कुमार यांनी सांगितले.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या “भारत बंद’ला राजस्थानमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद होत्या. मात्र काही दुकाने नेहमीच्या वेळी उघडलेली होती.