जालना : आपल्या सहा वर्षाच्या चिमुरड्याला ढकलून स्वत: धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या करण्याची घटना जालना जिल्ह्यातील शिरसगाव येथे घडली. यामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सय्यद अनिस सय्यद सुल्तान आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह रेल्वे रुळांवरून हस्तगत करण्यात आला. सय्यद हे परतूर तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी आहेत. ते एका विवाहासाठी शिरसगावला आले होते. त्यांनी कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गडम यांनी सांगितले.