भिगवण – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, स्वामी चिंचोली (ता. दौंड) हद्दीत दि.12 रोजी भीषण अपघात झाला, यात दोन जण जागीच ठार तर तीन जखमी झाले आहेत. वैभव जांभळे ,वय 24 (रा. तक्रारवाडी ता.इंदापूर जि.पुणे),प्रतीक गवळी,वय 22 (रा.मोशी ता. हवेली जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर आसिफ बशीर खान (वय 22),सुरज राजू शेळके वय 23( रा. भिगवन ता.इंदापुर जि.पुणे), ऋषिकेश येळे, (वय 22,रा.इंदापूर) अशी जखमींची नावे आहेत.
हा अपघात कार वरील नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.गाडीतील पाच जण भिगवण कडून पुणेच्या दिशेने स्विफ्ट कार मधून जात होते ही कार (एम.एच.42 ए एक्स 4729) हॉटेल पंचरत्न जवळ येताच चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले व कार पलटी झाली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.पुढील तपास रावणगाव पोलीस करीत आहेत.