श्रीरामपूर – येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहरातील रस्त्याच्या बाबतीत निवेदन देण्यात आले होते. परंतु आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर नगरपालिकेतून मिळेले नाही. यामुळे छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचेशी संपर्क साधला असता नगरपालिकेचे कर्मचारी म्हणाले, नगराध्यक्षा अनुराधा आदिक परदेशात गेलेल्या आहेत, त्या आल्यावर काम चालू होतील, तुम्ही उपोषण करू नये असे सांगण्यात आले.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष राजाराम शिंदे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष विलास पाटणे, उत्तर ग्रामीण संघटक संतोष घनवट, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष गणीभाई शेख, जिल्हा महासचिव दत्ताभाऊ कुमावत उपस्थित होते.