तांत्रिक त्रुटी अद्यापही कायम; यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी – देशभरात राष्ट्रीय महामार्ग तसेच द्रुतगती महामार्ग टोल नाक्यावर वाहनांच्या होणाऱ्या गर्दीपासून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने फास्टॅग ही योजना सुरू केली आहे.
मात्र, बहुतांश टोलनाक्यांवरील या यंत्रणेत असलेल्या त्रुटीमुळे वाहनचालकांची दुहेरी लुट होऊ लागली आहे. फास्टॅगद्वारे होणाऱ्या टोलच्या वसुलीचे मॅसेज उशीराने येत असल्यामुळे तसेच टोलनाक्यावर चालकांकडून रोख स्वरुपात घेण्यात येत असलेल्या रक्कमेमुळे एकाच टोलची रक्कम दोनवेळा वसुल केली जात आहे. शेकडो वाहचालकांना येत असलेल्या या अनुभवामुळे या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही दुहेरी लुट तात्काळ थांबवा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
टोलनाक्यांवर होणारी गर्दी कमी व्हावी व वाहनचालकांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी केंद्र शासनाने फस्टॅग ही महत्त्वकांक्षी यंत्रणा 1 डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेक ठिकाणच्या टोळनाक्यांवरही ही यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळे पहिल्यांदा पंधरा दिवस व त्यानंतर एक महिना मुदतवाढ देण्यात आली. आता पंधरा जानेवारीपासून सर्वच टोळनाक्यावर फास्टॅग बंधनकारकारक करण्यात आले आहे. मात्र काही टोळनाक्यांवर ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी राहिल्यामुळे ज्या वाहनांवर फास्टॅग आहे त्या वाहनधारकांची दुहेरी लुट सुरू झाली आहे.
फास्टॅगधारक वाहनावरील फास्टॅगमधून टोलची रक्कम वसूल होत असली तरी ही रक्कम वसूल न झाल्याचे सांगून संबंधितांकडून रोख रक्कम घेतली जात आहे. मात्र अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर फास्टॅगमधूनही रक्कम गायब होत असून त्याचा मॅसेच उशीराने वाहनधाकांच्या मोबाईलवर येत आहे. मात्र प्रवासात पुढे गेलेला वाहनधारक परत येत नाही. त्यामुळे टोलचालकांकडून अव्याहतपणे हा प्रकार सुरू आहे.
या प्रकारच्या शेकडो तक्रारी येऊ लागल्या आहे. चिंचवडगावातील रहिवाशी राहूल रुकारी यांनाही असाच अनुभव आला. रुकारी यांनी 21 डिसेंबरला नवीन गाडी (एमएच 14 एचडब्ल्य 7542) ही गाडी घेतली. 1 डिसेंबरपासूनच फास्टॅग बंधनकारक असल्यामुळे त्यांना गाडीसोबतच लावून मिळाला.
“फास्टॅग’चा वाहनचालकांना फटका
त्यानंतर 25 डिसेंबरला ते गाडी घेऊन सकाळी 6:39 वाजता पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून पुण्यावरून मुंबईला जाताना तळेगाव टोलनाक्यावर पोहोचले. त्यांच्या फास्टॅगमधून 173 रूपयांची कपात झाली. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने तसेच फास्टॅगच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड असल्याने त्याबाबतचा मेसेज मोबाइलवर आला नाही. तेव्हाच राहुल यांना तेथील कर्मचाऱ्यांनी फास्टॅग यंत्रणा बंद आहे असे सांगून 230 रुपये घेऊन पावती दिली. तेथून थोडे पुढे आल्यावर त्यांना फास्टॅगमधून पैसे कपातीचा मेसेज आला. तसेच मुंबईवरून परतत असताना असाच प्रकार परत घडला. त्यांना पुन्हा टोलनाक्यावर 230 रूपये घेऊन पावती देण्यात आली. म्हणजे फास्टॅगचे 173 रुपये आणि रोख 230 रुपये असे एकेरी प्रवासाचे 403 रुपये तर, दुहेरी प्रवासाचे एकूण 806 रूपये मोजावे लागले. त्यांना फास्टॅग बंद असल्याचे सांगितल्याने अशाप्रकारे आर्थिक भुर्दंड बसला. असाच प्रकार अनेक वाहनधारकांसोबत होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्याने टोलनाक्यावर फास्ट टॅगचा मेसेज आला नाही. त्यामुळे टोलनाक्यावर पावती फाडावी लागली. पर्यायाने दुहेरी प्रवासासाठी मला एकूण 806 रूपये मोजावे लागले. दहा दिवस उलटल्यानंतरही फास्ट टॅगमधून कपात झालेले पैसे अद्याप परत मिळालेले नाही.
– राहुल रूकारी, दळवीनगर.