पुणे – शेतकऱ्यांना परराज्यात शेतमाल विक्रीच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पणन मंडळाने देशातील 8 राज्यांतील व्यापाराचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असून समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालाचा अभ्यास केल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून विविध राज्यांमध्ये व्यापाऱ्यांमार्फत शेतमाल पाठविला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना तुलनेत कमी दर मिळून व्यापारी अधिक नफा मिळवितात. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना परराज्यातील शेतमाल विक्रीच्या थेट संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. ज्या राज्याचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यात राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कांदा, बटाटा, डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा, आंबा, केळी ही फळे व भाजीपाला पाठविल्यास फायदा होणार आहे.