जनता संवाद, सरपंच परिषदेचे आयोजन
कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या हेतूने जनता संवाद बैठका घेणार आहे. कर्जत येथे 21 नोव्हेंबर तसेच 25 नोव्हेंबरला जामखेड येथे सरपंच परिषद आयोजित केली जाणार आहे. यावेळी पोलीस पाटीलही उपस्थित राहणार आहेत. 17 नोव्हेंबरला बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याची माहिती आ. यांनी दिली.
कर्जत – कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात येत आहेत. त्यांचे काम चांगले सुरू आहे, मात्र तीन-चार दिवसात उर्वरित पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. एकही शेतकरी वंचित राहणार नाही. याची काळजी घ्यावी, अशा सूचना आ.रोहित पवार यांनी दिल्या.
पंचायत समिती सभागृहात अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, तहसीलदार सी. एम. वाघ, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, दीपक सुपेकर, राजेंद्र गुंड, मधुकर राळेभात, काकासाहेब तापकीर, श्याम कानगुडे, अशोक जायभाय, सुनिल शेलार, सचिन सोनमाळी, ऋषिकेश धांडे, उपसरपंच सचिन लाळगे, दीपक यादव, सुदाम धांडे आदी उपस्थित होते.