मलठण (पुणे) – महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. रब्बी हंगामासाठी 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी व उन्हाळी हंगामासाठी 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल असा कालावधी देण्यात आला आहे.
यावर्षी प्रथमच शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत उत्पादित केलेल्या पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्यासाठी या ऍपमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधील नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती पुरवठा विभागाला ऑनलाइन मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.