नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागील एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना समर्थन करणाऱ्या पंजाबमधील काही गटांनी राज्यातील रिलायन्स जिओच्या मोबाईल टॉवर्सवर हल्ला केला. यामुळे राज्यातील जिओच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जिओच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
#WATCH Villagers of Tibbi Kalan in Punjab's Firozpur vandalise a telecom tower to express their support towards farmers protesting against the three farm bills pic.twitter.com/sCWMYiU0Kq
— ANI (@ANI) December 28, 2020
स्थानिक माहितीनुसार, आंदोलकाना समर्थन करणाऱ्या गटांनी पंजाबमधील जिओच्या एक हजार ३०० टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित केला. पंजाबमध्ये जिओचे नऊ हजार टॉवर्स आहेत. यापैकी बऱ्याच टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स आंदोलकांनी कापल्याचे सांगण्यात येत आहे. मागील महिन्याभरापासून पंजाब आणि हरयाणामधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.
Punjab: Locals of Ekta Nagar near Moga vandalised a mobile tower in support of farmers protesting against Centre's farm laws, last night. Police say, "We are verifying facts of the incident. The farmers have condemned this act. They are not supporting such actions." pic.twitter.com/rHRm5UUMJU
— ANI (@ANI) December 28, 2020
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अंबानी आणि अदानी सारख्या बड्या उद्योजकांनाही विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी ग्रुप्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांनी या दोन्ही कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली.
शेतकरी जीओचे सीमकार्ड घेऊ नका असा प्रचार करतानाच जीओचे सध्याचे कनेक्शनही रद्द केले जात होते, असे या श्रेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगतात. अशाप्रकारे अहिंसक पद्धतीने शेतकऱ्यांना पाठींबा दिला जात असतानाच आता थेट जीओच्या सेवांमध्ये अडथळे निर्माण करत आंदोलकांनी हिंसक मार्ग अवलंबला असल्याचे चित्र दिसत आहे.