नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असून, पंजाब, हरयाणात या विधेयकांविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून दिल्लीत हरयाणा सीमेलगतची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे संगणयत येत आहे.
Punjab: Farmers, under the aegis of Bharatiya Kisan Union and Revolutionary Marxist Party of India (RMPI), block Amritsar-Delhi National Highway near Phillaur in Jalandhar, in protest against #FarmBills passed in the Parliament. pic.twitter.com/6zsXZ5VhnW
— ANI (@ANI) September 25, 2020
विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
मोदी सरकारने तीन कृषि विधेयकांना शेतकऱ्यांमधून विरोध वाढताना दिसत आहे. भारत बंदची हाक दिल्यानंतर आज शेतकरी रस्त्यावर उतरले. महामार्गावरील वाहतूक रोखत शेतकऱ्यांनी धरणे देणे सुरू केले आहे. हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वेही रोखल्या असून, शेतकरी आंदोलन लक्षात घेऊन अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.