मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. मात्र “कृषीमंत्र्यांच्याच मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करतायत”, अजित पवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पावले उचलावीत असे म्हटले.
यावेळी अजित पवार यांनी, एक लाख एकर क्षेत्र हवामान खराब झाल्यामुळे बाधित झालं आहे. आज सगळ्या विभागाचे आकडे आले आहेत. मुख्यमंत्री आश्वासन देतात की कांद्याची खरेदी सुरू झालीये, तशी ती झालेलीच नाहीये. बळीराजा त्रासलेला आहे. किंमती घसरल्यामुळे हस्तक्षेप करून खरेदी सुरू केली पाहिजे. सरकार म्हणतंय खरेदी सुरू झाली, पण तशी परिस्थिती नाहीये.असे म्हटले आहे.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटाबद्दल नियम ५७ अन्वये प्रस्ताव नाकारल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली. लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालते. सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. यात कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्या मतदारसंघात अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
काल महत्त्वाच्या कामकाजानंतर सरकारने काही निवेदन देऊन, शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करून त्यांना दिलासा देण्याची गरज होती. मात्र असे काहीही झाले नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे, असे अजित पवार म्हणाले.
सभागृह नियमाने सुरु असताना जर लोकांच्या मूलभूत अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण इथे बसून काय करणार, असा रोष अजितदादांनी व्यक्त केला. जेवढा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे तेवढाच शेतकऱ्यांचा विषय गंभीर आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.