नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटना आपले आंदोलन आक्रमक करण्यासाठी नव्या रणनीतीची आखणी करणार आहेत.
For almost two months, we are suffering and dying in cold weather. The government is giving us ‘tarikh pe tarikh’ and are dragging things so that we get tired and leave the place. This is their conspiracy: Hannan Mollah, General Secretary, All India Kisan Sabha #FarmLaws pic.twitter.com/NU88y5EOaV
— ANI (@ANI) January 17, 2021
त्यासाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडसंदर्भात शेतकरी रुट प्लान करणार असून रणनितीवरही चर्चा करणार आहेत. यासाठी सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यातच पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सरकारवर हल्लाबोल केला आहे . अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला म्हणाले,’ आंदोलन सुरु होऊन दोन महिने झाले, गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी थंडीने कुडकुडत आहे मार्ट आहे . मात्र सरकार फक्त ‘तारीख पे तारीख’ खेळून या आंदोलनबाबत निर्णय घेत नाही.’
दरम्यान, केंद्र सरकारसोबतच्या बैठकीनंतर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले. दोन मुद्दे आहेत, शेतीविषयक 3 कायदे मागे घ्यावे. असे ते म्हणाले.