नवी दिल्ली – गाझीपुर सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी विटांचा एक तात्पुरता आडोसा निर्माण केला आहे. या भिंतीला त्यांनी नेकी की दिवार असे नाव दिले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकरी बंधु भगिनींना कडाक्याच्या थंडीपासून आसरा देण्यासाठी ही भिंत व आडोसा बांधण्यात आला आहे.
या आडोशाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी गरजेच्या वस्तुंचा साठा केला जात असून देणगीदात्याकंडून या गोळा केलेल्या वस्तु तिथे ठेवल्या जात आहेत. त्यात दैनंदिन वापरांच्या वस्तू आणि गरम कपड्यांचा समावेश आहे.
ज्यांना ज्याची गरज आहे ती गरज शेतकऱ्यांनी तेथील भिंतीवर लिहायची ती त्यांना द्यायची व्यवस्थाही केली जाईल अशी माहिती या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते सुरविंदर किसान यांनी दिली. तेथे खडूही ठेवण्यात आले आहे ज्या योगे शेतकऱ्यांना आपल्या मागण्या लिहीता येतील.
ते म्हणाले की लंगरद्वारे शेतकऱ्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहेच. पण मास्क, सॅनिटायझर्स, गरम कपडे आणि अंथरूण पांघरूण व आंघोळीसाठीच्या सामानाचीही तेथे देणगीदात्यांच्यावतीने व्यवस्था केली जात आहे.