Rohit Pawar : काल ६ मार्ज रोजी राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष होते. कोणत्या नवीन घोषणा सरकार करणार याकडे अनेकांनी आशा लावली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा तरी दिलेला शब्द सरकार पाळून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार का याकडे बळीराजाचे लक्ष होते. अखेर अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. सरसकट कर्जमाफीची घोषणा न करता ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. या शेतकरी कर्जमाफी योजनेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकावर टीका केली आहे. “३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची सरकारने केलेली घोषणा ही अर्धवट, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी आहे. ” असे रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे. सरसकट कर्जमाफी करणे गरजेचं आहे असे म्हणत आम्ही ही बाब सरकारच्या निरदर्शनास आणून देऊन आणि सरसकट कर्जमाफी करण्यास भाग पाडू असेही रोहित पवार म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची सरकारने केलेली घोषणा ही अर्धवट, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी आहे. यंदा अतिवृष्टीमुळं संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाहून गेल्याने यंदाही कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये सरसकट समावेश करणं गरजेचं आहे. बजेटवर बोलताना ही बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि सरसकट कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू..! ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची सरकारने केलेली घोषणा ही अर्धवट, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी आहे. यंदा अतिवृष्टीमुळं संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाहून गेल्याने… — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2026 शेतकरी कर्जमाफी योजना नेमकी कशी आहे? पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा केली आहे. कर्जमाफीसोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ दिला जाईल. हेही वाचा : Anuj Agnihotri : सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने मिळवली UPSC परीक्षेत पहिली रँक; कोण आहेत डॅा. अनुज अग्निहोत्री?