नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. मात्र काही राज्यांमध्ये अजूनही लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी ओरड सुरू आहे. लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने राज्यांकडून लसीकरण केंद्र बंद केली जात आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,43,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,000 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,62,317 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
यातच करोनाच्या वाढत्या आकडेवारीला शेतकरी आंदोलनाच जबाबदार असल्याचे गंभीर आरोप खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर
“मी शेतकरी आंदोलनामुळे काही गावं कोरोनाचा हॉस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये-जा करत असल्याने हे घडलं आहे.” दरम्यान मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलकांवर जोरदार निशाणा साधला आहे.