नवी दिल्ली – गाझीपूर सीमेवरील सुरक्षा व्यवस्था बुधवारी आणखी वाढवण्यात आली. या भागात कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वाधिक शेतकरी आंदोलन करत आहेत. या भागात सलग पाचव्या दिवशी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी इंटरनेट सेवा पूर्ववत केली आहे. मात्र त्यात काही अडथळे येत असल्याचा दावा केला.
सींघू, गाझीपूर आणि टीकरी सीमेवर इंटरनेट सेवा खडीत करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे गृहमंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. भारतीय किसान युनियनचे पवन खताना यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी मी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणाच्या जिंद येथील महापंचायतीसाठी निघालो. त्यावेळेपर्यंत इंटरनेट सुविधा सुरळीत झाली नव्हती.
गाझीपूर सीमेवर लोखंडी खिळे ठोकलेले आहेत. लोखंडी आणि कॉंक्रिटच्या बॅरिकेडचे अनेक स्तर लावलेले आहेत. काटेरी तारेचे कुंपण आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकरी पुन्हा दिल्लीच्या दिशेने घुसू नये म्हणून आम्ही केवळ बॅरिकेडींग मजबूत करत आहोत, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले.