नगर – तालुक्यात कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत असून, महिन्याभराच्या आत नगर तालुक्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना अद्याप विस्मृतीत गेल्या नसतांनाच नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील तरुण शेतकरी महेश प्रभाकर कराळे याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
मागील वर्षीचा दुष्काळ व यावेळीही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस न झालेला पाऊस यामुळे शेतीव्यावसाय पूर्ण धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमाडले असल्याचे शेतकऱ्यामधून बोलले जात आहे. गेल्या महिन्यात नगर तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज सोमवार (दि.2) सकाळी कापूरवाडी येथील कराळे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपावली.